संपर्क करा

तळवे रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात : 5 जण जागीच ठार , मुलगा गेल्याचे समजताच आईने सोडला प्राण

तळवे रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात : 5 जण जागीच ठार , मुलगा गेल्याचे समजताच आईने सोडला प्राण

तळोदा : तालुक्यातील तळवे रोडवर गुरुवारी चार वाजताच्या सुमारास दुचाकीच्या समोरा-समोर धडकेमध्ये तुळाजा येथील 3 व तळोदा येथील 2 असे एकूण 5 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

                तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर सलसाडी फाट्याजवळ दुपारी 4 च्या सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांना आदळ्या गेल्याने ही घटना घडली. मुलाचे आधार अपडेटसाठी तळोदा येथे आलेले तुळाजा येथील कुटुंब आपले कामे आटोपून पुन्हा तुळाजाकडे जात असताना हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात दारासिंग छगन जाभोरे 48, मदन दिवळ्या नाईक 50, अमित मगन नाईक 10 हे जागीच ठार झाले तर बोरद येथून शेतीचा मोजनीचे कामे आटूपु दुचाकीने आई व पत्नी सोबत तळोदा येथे परतत असणाऱ्या उमेश शांतीलाल चव्हाण व सोबत असलेली त्याची आई सुंनंदा चव्हाण यांना गंभीर मार लागला असून, पूजा उमेश चव्हाण हिस मुक्का मार लागला.

        अपघात दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेले उमेश व त्यांच्या आईला डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातळीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आणले त्यांच्यावर डॉ.विजय पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉ.आफसिंग पाडवी वैद्यकीय अधिकारी, रमेश कलाल, तुषार चौधरी, आदींनी उपचार केले मात्र रक्तश्राव अधिक झाल्याने व डोक्याला जबर मार लागल्याने उमेश शांतीलाल चव्हाण रा.तळोदा वय 30 यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ.आफसिंग पाडवी यांनी सांगितले. तर सुनंदा शांतीलाल चव्हाण ह्या महिलेस पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा देखील रात्री 8 वाजेचा सुमारास मयात झाल्याची घटना घडली. सदर घटनेनंतर शहरात एकच चर्चा सुरू असून अपघातानंतर सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे......
        अपघात घडल्यानंतर पोलिसांना खबर मिळताच पो नी पंडित सोनवणे, पो.ना अजय पवार, पो.हे पिंटू अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला....

चौकट***
             नाईक परिवारतील दोन जण जागीच ठार झाले. हात मजुरी करून ते उदरनिर्वाह करत होते. मुलाला शिक्षणाची गोडी असल्याने पुढील शिक्षणासाठी लागणारे कागदपत्र व आधार कार्ड अपडेटसाठी ते तळोदा येथे आले होते. दरम्यान या भीषण अपघातात बाप व मुलगा याचा जागीच मृत्यू झाला. अमित हा तुळाजा येथे माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणाची गोडी असल्याने त्याचा पुढील शिक्षणासाठी अट्टहास होता. पुढे जाऊन नौकरी करून आई वडिलांना कष्टातुन मुक्त करेल असे तो नेहमी म्हणत होता. कुटूंबातील 2 घे जण गेल्याने कुटुंबाचा आधारच गेला. नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डॉगर कोसळला आहे, सदर घटनेची माहिती आईला कळताच त्यांनी एकच टाहू फोडला.....

चौकट:- 
          चव्हाण कुटुंबातील उमेश हा 10 वर्षाचे असतानाचा वडिलांचे छत्र हरपले. त्यांचे वडील शांतीलाल चव्हाण हे तळोद्यातील दिवंगत पत्रकार होते. त्यांच्या गेल्याने सर्वच जबाबदारी सुनंदा चव्हाण यांच्यावर आली. उमेशवर अगदी कमी वयातच कुटुंबाची जबाबदारिला उमेश तोंड देत होता. आई सुनंदा चव्हाण यांना 3 मुली व उमेश असा परिवारावार संस्कार घातले. कडू गोड आठवणींना आयुष्याचे गाडा हाकने तिचे सुरू होते. कष्ट करून हातावर त्यांनी तिघा मुलींचे लग्न केले. व उमेश यास उच्च शिक्षित केले. तो सध्या नाशिक येथे खाजगी कँपनीत नौकरी करत होता. नुकतेच 4 महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. आईच्या उमेशचा सोबत अपघात झाला असला तरी तिला एवढा मार लागलेला नव्हता असे प्रत्यक्ष दर्शनीच्या सांगण्यावरून कळले मात्र उमेश गेल्याचे तिला कळताच आईनेही प्राण त्याग केला.....


0 Response to "तळवे रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात : 5 जण जागीच ठार , मुलगा गेल्याचे समजताच आईने सोडला प्राण"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article